पाकिस्तानातील पत्रकारांचाच अन्सारींवर आरोप करणार्यावर अविश्वास
नवी दिल्ली – पाकिस्तानी पत्रकाराला माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी भेटले आणि नंतर या पत्रकाराने पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयला माहिती हस्तांतरीत केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने समाज माध्यमाद्वारे केल्यानंतर खळबळ उडाली होती. प्रत्यक्षात पाकिस्तानातील पत्रकारीतेत या पत्रकाराची ओळख आढ्यताखोर, प्रसिध्दीलोलूप आणि कटाचे काहीतरी कल्पोकल्पीत सिध्दांत मांडणारा अशी आहे. त्याच्या वक्तव्यावर पाकिस्तानातील पत्रकारांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. या पत्रकराने २००५ मध्ये झालेला भूकंप आणि २०११ मध्ये जपान मध्ये आलेली सुनामी ही अमेरिकेने घडवलेला कट होता अशी मांडणी करून खळबळ माजवून दिली होती.
नुसरत मिर्झा हे काराचीस्थित पत्रकार नवा इ वक्त आणि जंग या दैनिकात स्तंभलेखन करतात. सध्या ते एका टिव्ही चॅनेलवर एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी या मिर्झाला हमीद अन्सारी यांनी निमंत्रीत केले आणि गोपनीय माहिती हस्तांतरीत केल्याचा आरोप समाजमाध्यमांतून केला. अन्सारी यांनी हे आरोप फेटाळून लावत हा खोडसाळपणा आणि खोटारडेपणा असल्याचे स्पष्ट केले होते.
भाटीया यांनी पाकिस्तानी युट्यबर शकील चौधरी यांनी मिर्झा यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा उल्लेख केला. त्या मुलाखतीत मिर्झा यांनी अन्सारी यांचा दोनदा ओझरता उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी अन्सारी यांच्याशी कोठेेही संवाद साधल्याचाा उल्लेख केला नाही. पहिल्या उल्लेखात मिर्झा म्हणतात, २०१० मध्ये मी दहशतवादावरील परिषदेसाठी भारतात गेलो. त्यावेळी हमीद अन्सारी हे उपराष्ट्रपती होते असे म्हटले आहे.
त्यावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक हल्ला चढवला. त्याला उत्तर देताना अन्सारी म्हणाले, आंतराराष्ट्रीय दहशतवाद आणि मानवी हक्क यांवरील न्यायाधिशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन मी केले होते. त्यावेळी निमंत्रीतांची यादी आयोजकांनी बनवली होती. आपण मिर्झाला निमंत्रितही केले नाही अथवा त्याला भेटलोही नाही.
आपल्या मुलाखतीत दुसर्यांदा अन्सारी यांचा उल्लेख करताना, मी अन्सारी यांच्यासह अनेक काँग्रे्रस नेत्यांना भेटलो. पण यातही त्याने अन्सारी यांच्याशी चर्चा केल्याचा कोणत्याही तपशीलाचा उल्लेख केला नाही. मिर्झा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी केलेल्या फोनकॉलला कोणताही प्रतीसाद दिला नाही, असे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटले आहे.
या मुुलाखतीत मिर्झाने स्वत:चा उल्लेख भारतविषयक तज्ज्ञ असा केला आहे. २००५ आणि २००६ मध्ये भाारताला दिलेल्या भेटीत आपण अनेक शहरांना भेट दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या ५० मिनिटांच्या मुलाखतीत मिर्झाने आपल्या भाारत विषयक माहिती आणि अनुभवाला पाकिस्तानात कोणीही गांभीर्याने घेतले नाही आणि तरीही त्याकाळात सामरिक बाबतीत आपण महत्वाची कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाकिस्तानला भारतापासून सध्या धोका असताना पाकिस्तानात कोणी भारतविषयक तज्ज्ञ का नाही? या प्रश्नावर मिर्झाा म्हणताात आपल्याला भारताविषयी, भारतीय मुस्लीमांविषयी माहिती आहे. त्यातील काही आपले चांगले मित्रही आहेत. २००६ नध्ये आपण भारतातील अनेक शहरांना भेट दिल्यानंतर त्यावेळचे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसौरी यांनी आपल्याला सात देशांचा व्हिसा मिळवून दिला. (त्यावेळि पाकिस्तानी पर्यटकांना अधिकाधिक तीन शहरांसाठी व्हिसा मिळत असे) कसौरी यांनी मला आयएसआयचे महासंचालक अशफाक परवेझ कयानी यांना भेटण्यास सांगितले होते.
मी सांगितले, मी कयानींना भेटण्यास जाणाार नाही. तुम्हीच त्यांना ते करण्यास सांगा. त्यानंतर काही दिवसांनी एका ब्रिगेडीयरचा मला फोन आला. तुमच्याकडे काही अधिक माहिती आहे का? असे त्याने विचारले. मी म्हणालो, माझ्याकडे अतिरिक्त माहिती नाही. मी पुरेशी माहिती दिली आहे त्यावर काम करा.
पाकिस्तानला भारत चांगला माहिती आहे. कारण आपण मुगलांचे वंशज आहोत. आपण त्यांच्यावर राज्य केल आहे.
पाकिस्तानातील पत्रकार मात्र कसौरी हे मिर्झा सारख्या व्यक्तीशी चर्चा करत असल्याबद्दल अविश्वास दाखवतात. कसौरी यांच्या खास मर्जीतील पत्रकारांनी मिर्झा अथवा कसौरी यांनी एकमेकांविषयी कधीही काहीही बोलल्याचे आठवत नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे हे कथानक येथेच खोटे असल्याचे स्पष्ट होते, असे पाकिस्तानातील एका अनुभवी आणि अभ्यासू पत्रकाराने सांगितले. मिर्झा यांचे नाव हल्ली पत्रकारांमध्ये फाारसे घेतलेही जात नाही. त्यामूले त्यांनी केलेल्या कामापेक्षा अधिक वाढवून आणि चढवून ही कथा रंगवली असावी, असे मत अन्य एका पत्रकाराने व्यक्त केले.
मुंबई – महिलेला तिचा मुलगा किंवा करीयर यातील एक निवडण्यासाठी बळजबरी करता येणार नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने एका महिलेला नोकरी मिळाल्याने पोलंडला आपल्या मुलीसह जाण्याची परवानगी दिली.
याबाबत कनिष्ट न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करताना न्या. भरत डोंगरे यांनी व्यावसायिक हिताच्या हक्काकडे डोळेझाक करता येणार नाही, असे स्पष्ट केले. ‘व्यक्तीगत विकासाच्या महत्वाच्या मुद्द्याकडे कनिष्ठ न्यायाालयाच्या निर्णयात डोळेझाक करण्यात आली आहे. महिलेला मुलगा आणि करीयर यातील एकाची निवड करण्याची बळजबरी करता येणार नाही, त्यामूळे कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत आहोत, असे निकालात नमूद केले.
या निकालात, मुलीचा पुरेसा वेळ वडिलांना मिळावा. मात्र ती भाारताबाहेर असल्याने तीची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी रात्रीही संवादास अनुमती देण्यात यावी. याचा अर्थ मुलीला देत असलेला वेळ हा अधिक असावा असा नसून तो दर्जात्मक असावा. त्याच्यातून त्यांच्यातील पालकत्वाचे नाते विकसित व्हावे, असे न्यायालयाने त्या निर्णयात स्पष्ट केले.
हिवाळ्या सुटीत ही माता आाणि मुलगी भारतात परतल्यानंतर वडीलांना मुलीचा दिवसातील तीन तास वेळ आणि रात्रभर वेळ मंजूर करण्यात आला. उन्हाळ्याच्या सुटीत ती वडिलांकडे चार दिवस राहू शकेल. आणि दिवसातील पाच तास त्यांना एकत्र व्यतीत करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या या मुलीचे वडील तीला वेळ देऊ शकतात. ते तिला नियमीत अंतराने भेटू शकतात. त्यामुळे तिच्या भवितव्याची काळजी त्यांना वाटणे साहजिक आहे. पोलंडला गेल्यानंतर त्यांच्यातील नात्यात काहीसा दुरावा निर्माण होउ शकतो, ही खरी या पित्याची चिंता असल्याचे निरीक्षण नोंदवले.
व्यवसायाने अभियंता असणार्या या महिलेने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात अर्ज करून या मुलीचे पूर्ण पालकत्व मिळावे आणि मुलीला सोबत पोलंडला घेऊन जाण्याची परवानगी मिळावी त्यात तिच्या पतीने आणि वडिलांनी व्हिसासाठी हरकत घेऊ नये, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती ती फेटाळण्यात आली. त्यावेळी तीला उच्च न्यायालयात जाण्यास सुचवण्यात आले होते.
ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना पत्रकार महर्षी प्र. के. अत्रे पुरस्कार
पिंपरी –
सुदृढ, समृद्ध व तीक्ष्ण पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काळेवाडी येथे पुरस्कार सोहळ्यात केले. मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना “पत्रकार महर्षी प्र. के अत्रे पुरस्कार 2022” देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्ही.एस.आर.एस न्युज मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक डॉ. लालबाबू गुप्ता, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गिरीश प्रभुणे म्हणाले पुढे म्हणाले की, सध्याच्या आधुनिक युगामध्ये पत्रकारितेची बिकट वाट सुरू आहे. पत्रकारांनी स्वतःचा तोल स्वतःच सावरावा लागतो, कोणीही मदतीला येत नाही. मी स्वतः पत्रकारिता केली असून आठ पानाचे साप्ताहिक वर्तमानपत्र प्रकाशित करत होतो. मी सडेतोड लेख लिहिल्यामुळे माझ्या घरावरही हल्लेखोरांनी हल्ले केले आहेत. पत्रकारांनी सत्यतेची कास सोडू नये.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. लालबापू गुप्ता आपल्या भाषण म्हणाले की “राजकारण, समाजकारण व प्रशासनामध्ये न्याय मिळत नसेल तर शेवटी पत्रकारांकडे धाव घेतात. हा जो पत्रकारांप्रती विश्वास आहे तो विश्वास पत्रकारांनी कायम ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती विजय भोसले सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहर संघटना ही जरी नवीन असली तरी संघटनेत काम करणारे पदाधिकारी जुनेच आहेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे हे पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षे काम करत आहेत. बापूसाहेब गोरे यांनी कोरोनाच्या भीषण काळात पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरोघरी जाऊन अन्नधान्य कीट वाटप केले हा त्यांचा उपक्रम महाराष्ट्रात कौतुकास्पद ठरला आहे.
यावेळी माजी नगरसेवक कैलास थोपटे, युवक काँग्रेसचे शहरध्यक्ष नरेंद्र बनसोडे, आरपीआयचे अजीज शेख, काँग्रेसचे अशोक मोरे, बी.आर.माडगूळकर उपस्थित होते. या वेळी अध्यक्ष – दादाराव आढाव,वरिष्ठ उपाध्यक्ष – संतलाल यादव, उपाध्यक्ष – महेश मंगवडे, संजय बोरा,सरचिटणीस – सुनील कांबळे, चिटणीस – श्रध्दा कोतावडेकर/कामथे, कोषाध्यक्ष- जितेंद्र गवळी, कार्यकारणी सदस्य – सायली कुलकर्णी, विनोद लोंढे, संतोष जराड, विश्वास शिंदे, सदानंद रानडे, कलिंदर शेख, अमोल डांबळे, मनीषा प्रधान, श्रद्धा प्रभुणे, प्रितम शहा, गणेश शिंदे, मुकुंद कदम, अतुल वैराट, मोहन दुबे, सुहास आढाव या नूतन कार्यकारणीचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे, नरेश नातू, यशवंत नामदे, विकास चौधरी इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाची प्रस्तावना बापूसाहेब गोरे यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिध्द निवेदक अक्षय मोरे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष दादाराव आढाव यांनी मानले.
आत्महत्या कलेल्या मयतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) आदींचा समावेश आहे.
माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घऱात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार वनमोरे यांच्या डोक्यावर आर्थिक बोजा होता म्हणूनच सर्व कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.
माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे हे पुढील चाैकशी करत आहेत.