आत्महत्या कलेल्या मयतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) आदींचा समावेश आहे.
माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घऱात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार वनमोरे यांच्या डोक्यावर आर्थिक बोजा होता म्हणूनच सर्व कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.
माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे हे पुढील चाैकशी करत आहेत.
छत्तीसगड –
छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका विवाहित तरुणाला आणि त्याच्या मैत्रिणीला नग्न करून संपूर्ण गावात फिरवण्यात आले आहे. ही अत्यंत संवेदनशील बाब समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या भीषण कृत्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे.
ही घटना कोंडागाव जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्या पत्नीने तिच्या मैत्रिणीसोबत एका खोलीत पकडले. यानंतर महिलेने आरडाओरडा करून ग्रामस्थांना तेथे बोलावले. यानंतर गावकऱ्यांनीच तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला.
या शिक्षेअंतर्गत प्रथम विवाहित तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना विवस्त्र करून गावात फिरवले. ही घटना शनिवारी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्याचा व्हिडिओ आता समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आतापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
मुंबई –
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याप्रकरणी भारत सरकारने जगभरातील मुस्लिम समाजाची माफी मागावी या मागणीसाठी हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. दरम्यान अल-कायदा या दहशतवादी संघटनेनंही भारतातील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
आता देशातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर याच मुद्द्यावरुन सायबर हल्ले होताना दिसतायत. याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील 50 वेबसाईट्स हॅक झाल्यात. या हॅकर्सने जगभरातील मुस्लीम हॅकर्सला भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यासाठी आवाहनही केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काहींचा समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न सुरु असून या प्रकरणातील कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, “अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या ही वस्तुस्थिती आहे. एडीजी मधुकर पांडे पुढील तपास करत आहे. ठाणे पोलीस कमिशनची वेबसाईट हॅक झाली आहे, परंतु कोणताही महत्त्वाची माहिती लीक झालेली नाही. कोणत्याही कारणावरून समाज- समाजात एक प्रकारे तेढ निर्माण करण्याचे जे काम सुरु आहे त्याचे हे परिणाम आहेत. हॅकर्सनी जगभरातील सर्व हॅकर्सना विनंती केली आहे की, तुम्हीही यात सहभागी व्हा. राज्य सरकारच्या वतीने या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यावर काय उपाय योजना करायच्या आहेत त्यासंदर्भातही यंत्रणा कार्यरत आहेत. तथापी सर्व माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याने त्यामध्ये अधिक माहिती देण्यासाठी माझ्याकडे आता नाही.”
“हॅकर्सची जी मागणी आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात माफी मागितली पाहिजे. ज्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी जे प्रेषित पैगंबर मोहम्मदांबद्दल उद्गार काढले त्याबद्दल अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत कारवाई सुरु आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत पंतप्रधानांनी स्वत: ठरवले पाहिजे,” अशी मागणीही गृहमंत्र्यांनी केली आहे.
“ही घटना दुर्दैवी आहे. कारण आपल्या देशात समाजा-समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, त्याला प्रतिकार म्हणून प्रतिहल्ला म्हणून अशाप्रकारची कृती समाजातल्या टोकाच्या विचार करणाऱ्या लोकांकडून होत आहे. ही बाब बरोबर नाही कारण शेवटी सगळ्यांना सलोख्याने राहायचे असेल तर अडचणी भावना समजून घेणे गरजेचे आहे. हॅकर्सकडून जे अपील केले जात आहे ज्यामुळे नुकसान सर्वांचे होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून सर्वांनी दूर रहावं” अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे.
हडपसर –
मृत्यू कधी कुठे कसा गाठेल याचा नेम नाही. मैदानावर क्रिकेट खेळत असताना असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू असताना खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मैदानावर खळबळ उडाली होती.
हांडेवाडी येथील मैदानावर क्रिकेट खेळताना तरुणाचा दम लागून रविवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. श्रीतेज सचिन घुले (वय २२, रा. उंड्री, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सकाळी सात वाजता तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायला हांडेवाडी येथील मैदानावर गेला होता. दम लागल्याने तो खाली कोसळला. मित्रांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
श्रीतेजच्या आकस्मिक निधनाची माहिती कळताच परिसरात शोककळा पसरली. श्रीतेज हा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले व उंड्री गावच्या माजी सरपंच श्वेता घुले यांचा मुलगा होता. श्रीतेजला मोठा मित्र परिवार होता. त्याच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या पूर्वीही 17 फेब्रुवारीला अशीच एक घटना घडली होती. महेश उर्फ बाबू नलावडे याचा क्रिकेट खेळताना मैदानावरच मृत्यू झाला आहे. मैदानावरच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. तो 45 वर्षांचा होता. पुणे जिल्ह्यातील बोरी बुद्रुक येथील जाधववाडी गावात स्वर्गीय मयूर चषक क्रिकेट स्पर्धा सुरु होती. या वेळी ओझर संघ आणि जांबुत संघ यांच्यात क्रिकेट सामना सुरु असताना 17 फेब्रुवारी या दिवशी ही घटना घडली. या सामन्यात बाबू नलावडे हा फलंदाजी करत होता. नॉन स्ट्राईकला असताना अचानक तो खाली बसला आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला.
सामना सुरु असताना अचानक घडलेल्या या प्रकाराणे मैदानावरील खेळाडू आणि पंचांनाही धक्का बसला. मैदानावरील खेळाडू आणि स्पर्धेच्या आयोजकांनी त्याला नारायणगाव येथील डॉ. राऊत यांच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच बाबू नलावडे यांचा मृत्यू झाला होता.
पुण्यातील भवानी पेठ परिसरात विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये नुकताच स्फोट झाला होता. या प्रकरणी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबतचे गूढ वाढले आहे.
स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव रशाद मोहम्मद अली शेख असं आहे. रशादकडे चौकशी केल्यानंतर तो कोंढवा परिसरामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत लिशा इनकलेव या सोसायटीमध्ये राहत असल्याचं कळाल्यानंतर पुणे पोलीस तिथेही पोहोचले आणि आणि त्यांनी त्याच्या नातेवाईकांची देखील चौकशी केली.
भवानी पेठेतील या स्फोटमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, शेख या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे अनेक सिमकार्ड आणि पासपोर्ट आढळलेले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तो या पासपोर्टचा वापर करून अनेक देशात गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा स्फोट कशाचा झाला याचा तपास सुरू आहे. हा स्फोट नेमका वॉशिंग मशीनचा आहे की नाही याचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान ज्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला तेथून काही सिमकार्ड, पाकिस्तानी पुस्तकांसह संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पुणे पोलीस अजूनही काही बोलायला तयार नसल्यानं या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत चाललं आहे.
रशाद मोहम्मद अली शेख असे या फ्लॅटधारकाचे नाव असून तो वॉशिंग मशीन, ओव्हन रीपेअरींगची कामे करतो. प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट वॉशिंग मशीन रिपेअर करताना झाल्याचं समोर आलं होतं. शेख हा गेल्या 10 वर्षांपासून या सोसायटीत वास्तव्यास असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मुस्ताक अहमद यांनी दिली. राशद हा मुळचा मुंबईतला आहे. तो इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. मात्र तो गेल्या 10 वर्षांपासून याच फ्लॅटमध्ये राहतो आहे.
पुणे –
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधील भुज येथून तर महाकाळला मंचर येथून अटक केली. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ कांबळे यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याची कबुली दिली आहे. संतोष जाधवला आश्रय देणाऱ्या नवनाथ सूर्यवंशी याच्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही गुन्हेगारांना 20 जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणात पंजाब पोलिसांच्या तपासात पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांची नावे समोर आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी सौरभ महाकाळ याला मंचर येथून अटक केली आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीशी आपले संबंध असल्याची कबुली संतोष जाधव आणि सौरभ महाकाल कांबळे यांनी दिली आहे. नवनाथ सूर्यवंशी याची संतोष जाधवला आश्रय दिल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अधिक माहिती पुढे येईल, असे ते म्हणाले.
टक्कल करूनही संतोष जाधव पोलिसांच्या तावडीत सापडला
सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या संतोष जाधव याला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुजरातच्या बीड जिल्ह्यातील मांडवी गावात तो एका मित्राच्या घरी लपून बसला होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने संपूर्ण पेहराव बदलला होता. डोक्यावरचे संपूर्ण केस काढून टक्कल केले होते. मात्र पोलिसांनी त्याला अटक केलीच. त्याच्यासोबत पोलिसांनी नवनाथ सुरेश सूर्यवंशी या त्याच्या साथीदाराला ही अटक केली आहे.
पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याचा 29 मे रोजी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी एकूण आठ संशयित आरोपींची यादी जारी करण्यात आली होती. त्यात पुणे जिल्ह्यातील सौरव महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे आणि संतोष जाधव या दोघांचा समावेश होता. सौरव महाकाल याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. त्यानंतर रविवारी संतोष जाधव याला देखील अटक करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात ओमकार उर्फ राण्या बाणखेले या तरुणाचा खून झाला होता. या खून प्रकरणातील संतोष जाधव हा प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर मुक्काम नुसार कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी अटक केलेल्या सौरव महाकाल त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने संतोष जाधव हा गुजरात येथे नवनाथ सूर्यवंशी या आपल्या मित्राकडे राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी गुजरात राज्यात जाऊन ही कारवाई केली.
भुज जिल्ह्यातील मांडवी गावात जिल्हा ग्रामीण पोलिसांचे पथक पोहोचले तेव्हा त्यांना नवनाथ सूर्यवंशी मिळाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने माहिती देण्यास नकार दिला. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संतोष जाधव यांच्या विषयी माहिती दिली. भूज जिल्ह्यातीलच नागोर गावात आपल्याच एका ओळखीच्या व्यक्तीकडे नवनाथने त्याला ठेवले होते. पोलीस जेव्हा त्याला अटक करण्यासाठी केली तेव्हा संतोषने संपूर्ण टक्कल करून आपला पेहराव बदलला होता, मात्र तरीही पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याच.
नॅशनल हेराल्ड काय आहे ?
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी 20 नोव्हेंबर 1937 रोजी असोसिएटेड जर्नल लिमिटेड (AJL) ची स्थापना केली. विविध भाषांमध्ये वर्तमानपत्रे प्रकाशित करणे हा त्याचा उद्देश होता. त्यानंतर इंग्रजीमध्ये ‘नॅशनल हेराल्ड’, हिंदीमध्ये ‘नवजीवन’ आणि उर्दूमध्ये ‘कौमी आवाज’ ही वृत्तपत्रे एजेएल अंतर्गत प्रकाशित झाली.एजेएलच्या निर्मितीमध्ये पं. जवाहरलाल नेहरू यांची भूमिका होती, परंतु ते कधीही त्यांच्या मालकीचे नव्हते. कारण, 5000 स्वातंत्र्यसैनिक या कंपनीला पाठिंबा देत होते आणि ते तिचे शेअर होल्डरही होते. 90 च्या दशकात ही वृत्तपत्रे तोट्यात जाऊ लागली. 2008 पर्यंत एजेएलवर 90 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज होते. मग AJL ने निर्णय घेतला की यापुढे वर्तमानपत्र प्रकाशित केले जाणार नाहीत. AJL वृत्तपत्रांचे प्रकाशन बंद केल्यानंतर ते मालमत्ता व्यवसायात उतरले.
वादाची सुरुवात कुठून झाली?
2010 मध्ये एजेएलचे 1057 भागधारक होते. नुकसान होत असताना, त्याचे ‘होल्डिंग यंग इंडिया लिमिटेड’ अर्थात YIL कडे हस्तांतरित करण्यात आले. यंग इंडिया लिमिटेडची स्थापना त्याच वर्षी म्हणजे 2010 मध्ये झाली. यामध्ये काँग्रेस पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी संचालक म्हणून सामील झाले. राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांची कंपनीत 76 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित 24 टक्के काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस (दोघांचेही निधन झाले आहे) यांच्याकडे होते.
.. मग गुन्हा दाखल झाला
2012 मध्ये, भाजप नेते आणि देशातील प्रसिद्ध वकील सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार होते.सुब्रमण्यम स्वामी यांनी दावा केला की YIL ने 2,000 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आणि नफा मिळविण्यासाठी निष्क्रिय प्रिंट मीडिया आऊटलेट्सची मालमत्ता ‘चुकीच्या’ पद्धतीने अधिग्रहित केली.
AJL ने काँग्रेस पक्षाला दिलेले 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचे अधिकार मिळवण्यासाठी YIL ने फक्त 50 लाख रुपये दिले, असा आरोपही स्वामी यांनी केला. ही रक्कम पूर्वी वृत्तपत्र सुरू करण्यासाठी कर्ज म्हणून दिली होती. एजेएलला दिलेले कर्ज बेकायदेशीर होते, कारण ते पक्षाच्या निधीतून घेतले होते, असा आरोपही त्यांनी केला.
ईडीची चौकशी, कोर्टाने केला सोनिया-राहुलला जामीन मंजूर
2014 मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. त्यामुळे दोघेही कोर्टात पोहोचले. याप्रकरणी 19 डिसेंबर 2015 रोजी ट्रायल कोर्टाने दोघांनाही जामीन मंजूर केला होता. 2016 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील पाचही आरोपींना (सोनिया, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे) वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली होती, त्यांच्याविरुद्धची कार्यवाही रद्द करण्यास नकार दिला होता.
शासनाची कारवाईही ठरली
2018 मध्ये केंद्र सरकारने 56 वर्षे जुनी कायमस्वरूपी लीज संपवण्याचा निर्णय घेतला. पुढे, एजेएल कोणतीही छपाई किंवा प्रकाशन क्रियाकलाप करत नसल्याच्या कारणावरून हेराल्ड हाऊसच्या परिसरातून एजेएलला बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या कामासाठी इमारत 1962 मध्ये देण्यात आली होती. तथापि, 5 एप्रिल 2019 रोजी, सुप्रीम कोर्टाने पुढील सूचना येईपर्यंत सार्वजनिक परिसर (अनधिकृत रहिवाशांचे निष्कासन) कायदा, 1971 अंतर्गत AJL विरुद्धच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्याचा आदेश दिला. आता या प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
राहुल गांधींना अटक होऊ शकते का?
सर्वोच्च न्यायालयाचे वकील चंद्र प्रकाश पांडे म्हणाले, ‘सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. अशा परिस्थितीत, चौकशीदरम्यान, जर ईडीला राहुल तपासात सहकार्य करत नाही असे वाटत असेल तर ते त्याला ताब्यात घेऊ शकतात. यानंतर राहुलला न्यायालयात हजर केले जाईल, तेथून त्याला ईडीच्या कोठडीत पाठवायचे की न्यायालयीन कोठडीत याचा निर्णय घेतला जाईल.