मुंबई – शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावरील मनी लाँड्रीगच्या आरोपांच्या चौकशीची तपासणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. त्यांनी परब यांच्या रिसॉर्टचे बांधकाम करत असताना सागरी सीमा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याचीही तपासणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी न्यूज मेट्रोला सांगितले. या घटनेचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
परब यांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दापोली (जि. रत्नागिरी) येथील त्यांच्या रिसॉर्टच्या बांधकामाप्रकरणी अंमलबजावणी संचनालयाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांना केंद्रीय पथकाकडून लक्ष्य बनवले जात असल्याची जोरदार टीका राजकीय वर्तुळात झाली होती. यापुर्वी ठाकरे यांचे विश्वासू निकटवर्तीय संजय राऊत यांचीही अंमलबजावणी संचनालयाने चौकशी केली होती.
अंमलबजावणी संचनालयाच्या दबावापाोटीच महाराष्ट्रातील आघाडी सरकार कोसळले. त्यामागे केंद्रीय यंत्रणांचा वापर करूनब घेत असल्याची टीका होत होती. त्याला उत्तर देताना शिंदेसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असल्याची कोपरखळी मारली होती.