मुंबई – शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावरील मनी लाँड्रीगच्या आरोपांच्या चौकशीची तपासणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. त्यांनी परब यांच्या रिसॉर्टचे बांधकाम करत असताना सागरी सीमा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याचीही तपासणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी न्यूज मेट्रोला सांगितले. या घटनेचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
परब यांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दापोली (जि. रत्नागिरी) येथील त्यांच्या रिसॉर्टच्या बांधकामाप्रकरणी अंमलबजावणी संचनालयाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांना केंद्रीय पथकाकडून लक्ष्य बनवले जात असल्याची जोरदार टीका राजकीय वर्तुळात झाली होती. यापुर्वी ठाकरे यांचे विश्वासू निकटवर्तीय संजय राऊत यांचीही अंमलबजावणी संचनालयाने चौकशी केली होती.
अंमलबजावणी संचनालयाच्या दबावापाोटीच महाराष्ट्रातील आघाडी सरकार कोसळले. त्यामागे केंद्रीय यंत्रणांचा वापर करूनब घेत असल्याची टीका होत होती. त्याला उत्तर देताना शिंदेसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असल्याची कोपरखळी मारली होती.
ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना पत्रकार महर्षी प्र. के. अत्रे पुरस्कार
पिंपरी –
सुदृढ, समृद्ध व तीक्ष्ण पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काळेवाडी येथे पुरस्कार सोहळ्यात केले. मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना “पत्रकार महर्षी प्र. के अत्रे पुरस्कार 2022” देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्ही.एस.आर.एस न्युज मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक डॉ. लालबाबू गुप्ता, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गिरीश प्रभुणे म्हणाले पुढे म्हणाले की, सध्याच्या आधुनिक युगामध्ये पत्रकारितेची बिकट वाट सुरू आहे. पत्रकारांनी स्वतःचा तोल स्वतःच सावरावा लागतो, कोणीही मदतीला येत नाही. मी स्वतः पत्रकारिता केली असून आठ पानाचे साप्ताहिक वर्तमानपत्र प्रकाशित करत होतो. मी सडेतोड लेख लिहिल्यामुळे माझ्या घरावरही हल्लेखोरांनी हल्ले केले आहेत. पत्रकारांनी सत्यतेची कास सोडू नये.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. लालबापू गुप्ता आपल्या भाषण म्हणाले की “राजकारण, समाजकारण व प्रशासनामध्ये न्याय मिळत नसेल तर शेवटी पत्रकारांकडे धाव घेतात. हा जो पत्रकारांप्रती विश्वास आहे तो विश्वास पत्रकारांनी कायम ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती विजय भोसले सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहर संघटना ही जरी नवीन असली तरी संघटनेत काम करणारे पदाधिकारी जुनेच आहेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे हे पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षे काम करत आहेत. बापूसाहेब गोरे यांनी कोरोनाच्या भीषण काळात पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरोघरी जाऊन अन्नधान्य कीट वाटप केले हा त्यांचा उपक्रम महाराष्ट्रात कौतुकास्पद ठरला आहे.
यावेळी माजी नगरसेवक कैलास थोपटे, युवक काँग्रेसचे शहरध्यक्ष नरेंद्र बनसोडे, आरपीआयचे अजीज शेख, काँग्रेसचे अशोक मोरे, बी.आर.माडगूळकर उपस्थित होते. या वेळी अध्यक्ष – दादाराव आढाव,वरिष्ठ उपाध्यक्ष – संतलाल यादव, उपाध्यक्ष – महेश मंगवडे, संजय बोरा,सरचिटणीस – सुनील कांबळे, चिटणीस – श्रध्दा कोतावडेकर/कामथे, कोषाध्यक्ष- जितेंद्र गवळी, कार्यकारणी सदस्य – सायली कुलकर्णी, विनोद लोंढे, संतोष जराड, विश्वास शिंदे, सदानंद रानडे, कलिंदर शेख, अमोल डांबळे, मनीषा प्रधान, श्रद्धा प्रभुणे, प्रितम शहा, गणेश शिंदे, मुकुंद कदम, अतुल वैराट, मोहन दुबे, सुहास आढाव या नूतन कार्यकारणीचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे, नरेश नातू, यशवंत नामदे, विकास चौधरी इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाची प्रस्तावना बापूसाहेब गोरे यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिध्द निवेदक अक्षय मोरे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष दादाराव आढाव यांनी मानले.
आत्महत्या कलेल्या मयतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) आदींचा समावेश आहे.
माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घऱात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार वनमोरे यांच्या डोक्यावर आर्थिक बोजा होता म्हणूनच सर्व कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.
माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे हे पुढील चाैकशी करत आहेत.
राज्यात नवीन २३ संवर्धन राखीव, ५ अभयारण्यांची निर्मिती
मुंबई –
राज्यात मागील अडीच वर्षात १७५०.६३ चौ.कि.मी चे २३ नवीन संवर्धन राखीव, ६४७.१२९४ चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्ये आणि ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून, या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे. शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी ९ संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाले असून उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसुचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.
राज्यातील ‘ही’ आहेत संवर्धन राखीव क्षेत्रं (कंसातील आकडे चौ.कि.मी) :
शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव (२६९.४० चौ.कि.मी), विस्तारीत अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ७८.४०), जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी (१२२.७४०), गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का ( १७५.७२), बुलडाणा जिल्ह्यातील विस्तारीत लोणार वन्यजीव अभयारण्य ( .८६९४) अशी पाच अभयारण्ये याच कालावधीत घोषित केली आहेत. यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसुचना निघाली असून उर्वरित अभयारण्याची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.
पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड (३३.०१), धुळे जिल्ह्यातील लांडोरखोरी (४८.०८), कोल्हापूर जिल्ह्यातील बांबर्डे मायरेस्टिका (२.५९) आणि शिुस्टुरा हिरण्यकेशी ही चार जैवविविधता वारसा स्थळे मागील अडीच वर्षाच्या काळात घोषित करण्यात आली असून या सर्वांची अधिसुचना निर्गमित झाली आहे.
लोणारला रामसर साईट दर्जा मिळाला असून ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या रामसर दर्जाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.